पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये काय आहे सविस्तर बातमी | Pay Rs 10,000 per acre to farmers for sowing, Divisional Commissioner Sunil Kendrekar demands from the government.

 

पेरणीसाठी शेतकऱ्यांना प्रती एकर 10 हजार रुपये द्या, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकरांची सरकारकडे मागणी. 


मराठवड्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रतिहंगाम 10,000 रुपये अनुदान द्यावे अशा प्रकारचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात अला आहे. मित्रांनो गेल्या 3-4 वर्षापासून निसर्गाच्या वेगवेगळ्या संकटामुळे शेतकऱ्यांचे रब्बी असो किंवा खरीप हंगामचे निसर्गाच्या लाहारीपानमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

कधी अवकाळी तर कधी अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी संकटात सापडला आहे. 

एकरी 10000 अनुदान मागणी
एकरी 10000 अनुदान मागणी 

बऱ्याच वेळा शेतकऱ्यांना दुबार पेरणी सारख्या संकटाला सामोरे जावे लागते. अतिव्रष्टी नुकसान भरपाई, गरपीट नुकसान भरपाई, अवेळी पाऊस नुकसान भरपाई, पावसाचा खंडामुळे नुकसान भरपाई अश्या वेगवेगळे दिले जाते. परंतु हे अनुदान वेळेत मिळत नाही किंवा त्याचा फायदा शेतकाऱ्यांना गरजेवेळी होत नाही. त्यामुळे वेगवेगळे अनुदान देण्यापेक्षा एकवेळचे निविष्ट अनुदान देण्यात यावे अशा प्रकारशी मागणी मराठवड्याचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या माध्यमातून राज्य शासनाला करण्यात आली आहे.

      त्यात डोक्यावर झालेलं कर्ज आणि आर्थिक परिस्थितीला कंटाळून अनेक शेतकरी आत्महत्या सारखं टोकाचे पाऊल उचलत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर (Sunil Kendrekar) यांनी आठही जिल्ह्यात एक सर्व्हे केला आहे. ज्यात पाच लाख कुटुंबाचे 12 टप्प्यात आणि 100 प्रश्न तयार करुन हा सर्व्हे करण्यात आला आहे. तर शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी हंगामाच्या पेरणीसाठी प्रती एकर 10 हजार रुपये रोख रक्कम देण्याचा निकष या सर्व्हेमधून काढण्यात आला आहे. तर याबाबतचं अहवाल सरकारला देणार असल्याची माहिती सुनील केंद्रेकर यांनी दिली आहे. 

शेतकरी बांधवानो 2023 मध्ये मान्सून मध्ये मोठ्या प्रमाणात अलनिनो चा प्रादुर्भाव दिसू शकतो, याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दुबार पेरणी चे देखील संकट येऊ शकते. अशा प्रकारची परिस्थिति वर्तवली जात आहे. शेतकऱ्यांना आत्महतेपासून पराव्रत करण्यासाठी व शेतकऱ्यांना सबल करण्यासाठी अशा प्रकारचे निविष्ट अनुदान दिले तर शेतकरी दुबार पेरणीसारखे संकट जरी आले तर त्याला सामोरे जाऊ शकतात. याच पार्श्वभूमीवर रब्बी असो किंवा खरीप हंगाम अशा प्रत्येक हंगामसाठी शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणून एकवेळचे अनुदान 10,000/- रु. द्यावे अशा प्रकारचा दिलासादायक प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्यात आलेला आहे.

शेतकरी-पेरणी-अनुदान
शेतकरी-पेरणी-अनुदान

ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. अतिव्रष्टी नुकसान भरपाई असेल किंवा इतर नुकसान भरपाई असेल, बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना अशा नुकसान भरपाई पासून वंचित रहावे लागते किंवा मिळते पण ज्यावेळेस शेतकऱ्यांना त्याची गरज असते तेव्हा त्यांच्याजवळ उपलब्ध नसतात.   

याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. संपूर्ण सर्व्हेचा डेटा ऑनलाईन केला. ज्यात जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत असल्यास त्याचा रेड अलर्ट दिसतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. विशेष म्हणजे अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहे.

या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सरसकट मदत शासनाच्या माध्यमातून दिली तर नक्कीच शेतकरी समाधानी असतील. आता हे पाहणं तितकंच महत्वाचे आहे की “हा प्रस्ताव राज्य शासन मंजूर करते की फेटाळला जातोय.” याकडे सर्व मराठवड्याचे लक्ष लागलेले आहे. यापूर्वी 2023 च्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना वार्षिक 6000/- मानधन देण्याचे घोषित केले आहे. या प्रस्तावावर सरकारने जर सकारात्मकता दर्शवली तर शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होऊ शकतो.

shetkari-perani-anudan
shetkari-perani-anudan


याबाबत बोलताना केंद्रेकर म्हणाले की, सध्या शेतकऱ्यांची परिस्थिती खूप वाईट आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी आणि शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी आम्ही एक सर्व्हे केला. ज्यात आमच्या जिल्हाधिकारी यांनी देखील स्वतः शेतकऱ्यांच्या घरी जाऊन माहिती जमा केली. संपूर्ण सर्व्हेचा डेटा ऑनलाईन केला. ज्यात जे शेतकरी आत्महत्या करण्याच्या विचारत असल्यास त्याचा रेड अलर्ट दिसतो. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कार्यालयात बोलावून त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांची अडचणी समजून घेतल्या जात आहे. तसेच त्यांचे समुपदेशन करण्यात येत आहे. पण शेतकरी आत्महत्या करण्याचं महत्वाचा कारण आर्थिक परिस्थितीच आहे. त्यामुळे पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना 10 हजार रुपये प्रती एकर दिल्यास आत्महत्या रोखण्यात यश येऊ शकते असे केंद्रेकर म्हणाले. विशेष म्हणजे अशाप्रकारे सरकारकडे शिफारस करणारे केंद्रेकर पहिले अधिकारी आहे.


सर्व्हेमधील प्रश्न कोणते?

 

शेतकऱ्यांची प्राथमिक माहिती

शेतकऱ्याचे नाव, पत्ता, शिक्षण, रोजगाराची माहिती, सात बारावर बोजा आहे का?

शेतकऱ्यांची कौटुंबिक माहिती:

कौटुंबिक माहिती, कुटुंबात विवाहयोग्य मुली आहेत का?

विवाह आर्थिक अडचण आहे का?

कर्जामुळे कौटुंबिक कलह आहे का?

व्यसन आहे का?

घरात बेरोजगारांची संख्या

घरगुती सुविधा माहिती:

स्वतःचं घर आहे का?

शासकीय योजनेमधून घर मिळाले आहे का?

घरासाठी कर्ज काढले आहे का?

वीज, गॅस, नळ शौचालय आहे का?

सामाजिक सहभाग विषयी माहिती:

कुटुंबातील कोणी ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी, इतर स्वराज्य संस्था सदस्य आहेत का?

कुटुंबातील कोणी बचतगट सदस्य आहे का?

धार्मिक कार्यक्रम आवड आहे का?

योजना लाभ विषयक माहिती:

पिवळे रेशन कार्ड धारक कुटुंब आहे का?,

नरेगा जॉब कार्ड आहे का?,

जनधन योजना बँक खाते आहे का?,

आरोग्य पोषण आणि शिक्षण विषयक माहिती:

सद्यस्थितीतील कर्जाविषयक माहिती:

राष्ट्रीय बँक कर्ज आहे का? असल्यास तपशील

सहकारी बँक कर्ज आहे का?

वित्तीय संस्थेचं कर्ज आहे का?

खाजगी सावरकर कर्ज आहे का? असल्यास तपशील

कर्ज माफी मिळाली आहे का?

कौटुंबिक उपजीविकेविषयक माहिती:

एकूण शेतजमीन माहिती

कोरडवाहू/जिरायत शेतीची माहिती

बागायत शेतजमीन माहिती

शेतजमीन पाणी स्त्रोत

शेतात वीज जोडणी आहे काय?

वीज बिल थकीत आहे का? असल्यास तपशील

मागील एक वर्षातील पीक व उत्पादन:

खरीप, रब्बी,उन्हाळी,फळबाग, चारा पिके, बांधावरील झाडे यांची माहिती

कृषी योजनाविषयक माहिती:

पाण्याचा स्त्रोत, पाईपलाईन, ठिबक, इत्यादी उपलब्ध आहे का?

कोरडवाहू असल्यास मनेरगा अंतर्गत विहिरीची आवश्यकता आहे का?

शेततळ्याची आवश्यकता आहे काय?

कृषी खात्याच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे काय? असल्यास तपशील

पीक विमा योजना लाभ घेतला आहे काय? असल्यास तपशील

शेती संबधी कोणत्या मदतीची गरज आहे? असल्यास तपशील

पशुधन विषयक बाबी:

पशुधन आहे का? असल्यास त्यांचे तपशील,

पशुधन विमा घेतला असल्यास माहिती

स्थलांतर विषयक माहिती:

कुटुंबातील कोणत्या सदस्याने स्थलांतर केले आहे का?, असल्यास तपशील

व्यक्तीमधील ताण-नैराश्य ओळखण्यासाठी प्रश्नावली:

नेहमी जास्त काळ उदास वाटते का? असल्यास तपशील

जास्तीत जास्त गोष्टीमध्ये आनंद किंवा रस वाटत नाही का?

बराच वेळ थकवा जाणवतो का?

झोप लागत नाही का?

भूक कमी किंवा जास्त लागते,

खूप अस्वस्थ वाटते का?

अति झोप लागते का?

स्वतः बद्दल तीव्र नाराजी इत्यादी

Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिक्रत वेबसाइट नाही किंवा कोणत्याही शासनाशी संबंधित नाही. क्रपया याला official वेबसाइट म्हणून मानू नका आणि खाली कमेंट मध्ये आपला संपर्क किंवा आधार क्रमांक किंवा मोबाइल क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती पाठवू नका. आम्ही कोणत्याही योजने संदर्भातील तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाही. आम्ही आमच्या सर्व अभ्यंगताना संबंधित तक्रारी, योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या official संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्याना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post

Contact Form